तहात जिंकलो, आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचे आहे – उध्दव ठाकरे

0
407

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  युतीच्या तहात जिंकलो आहे, आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचे आहे,  असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.  युतीची  घोषणा झाल्यानंतर ‘मातोश्री’वर आलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी  संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.  

मी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला आहे का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारताच, एकसूराने ‘हो, शंभर टक्के’ असे  शिवसैनिकांनी उत्तर दिले. प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडीमध्ये गेलेला आहे. जर अविचारी पक्ष एकत्र येतात मग समविचारी पक्ष का नाही? गेल्या काही दिवसात भाजप नेतृत्वाकडून येणारा अनुभव बदलला आहे. म्हणून आपण युती केली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

ज्या पक्षाच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा करार होता. मात्र मी ते स्वीकारले नाही. मी समसमांतर जागा वाटप केले. आपले जे स्वप्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचे, ते मी पूर्ण करणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केला. आधी लोकसभेच्या २२ जागा लढवत होतो, मी एक जागा वाढवून घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.