…तर शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाही; रामदास कदमांचा अमित शहांना इशारा

0
785

बीड, दि. ९ (पीसीबी) –  शिवसैनिक लवकर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही, तसेच एकदा पेटला की कुणाला गाडल्याशिवाय राहत नाही. याचा अनुभव अमित शहासाहेबांना भविष्यात येईल, असे राज्याचे पर्यावरण मंत्री  रामदास कदम यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे.  

बीडच्या दौऱ्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज आले आहेत. तत्पूर्वी कदम बोलताना म्हणाले की, युतीत कितीही तणाव निर्माण झाला, चर्चा झाल्या तरी युतीचा निर्णय शेवटी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात जाहीर सभा झाली. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात बीडमधून झाली. या दौऱ्यात ठाकरे बीड आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.