…तर आम्ही राहुल गांधींची काश्मीरला जाण्याची व्यवस्था करू – संजय राऊत

0
341

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना काश्मीरमध्ये मजा करायला जायचे असेल, तर आम्ही त्याची व्यवस्था करू. त्यांच्या फिरण्याची आणि मौजमजेची  काश्मीरमध्ये  व्यवस्था  करण्याची विनंती आम्ही पर्यटन विभागाला  करू,  असा खोचक  टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  लगावला.  

राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी काश्मीरमध्ये जाण्यासाठी श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यांना विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले. यामुळे केंद्र सरकार काश्मीरमधील खरी परिस्थिती लपवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले की,  राहुल गांधी काश्मीरमध्ये गेल्यास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना विमानतळावरून परत पाठवण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता. कलम ३७० रद्द झाल्याने कोणाची स्वप्ने पूर्ण होणार, हे मला माहिती नाही. मात्र, संपूर्ण देशाला ही गोष्ट व्हायला पाहिजे, असे वाटत होते, असेही राऊत म्हणाले.