नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – सध्या देशात ‘मी टू’ वादळ घोंघावत आहे. जर खासदार जयापद्रा पोलीस ठाण्यात गेल्या, तर आझम खान जेल रोड निवासस्थानावरुन थेट जेलमध्ये जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदूंसाठी असल्याचेही ते म्हणाले.
फिरोजबाद येथे हिंदू युवा वाहिनी भारतच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमरसिंह म्हणाले की, रामगोपाल यादव यांनी फिरोजाबादमध्ये येऊन सुरक्षित परत जाण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळेच मला फिरोजाबादला येणे गरजेचे होते. लोकशाहीत हिंदुत्वाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे फुट पाडण्याचा प्रयत्न करु नका, नाहीतर आझमसारख्या लोकांचे हात कापले जातील. सपा-बसपा आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, सरगमसाठी सुरांची गरज असते. परंतु, सपाचे तर सूरच बिघडले आहेत.