मुंबई, दि. ६ (पीसीबी) – औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे. त्यांनी केलेला दानवेंबद्दलचा आरोप खरा ठरला, तर लोक बिथरतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, जालन्यासाठी आम्ही खोतकरांची समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत, ते जर खरे ठरले, तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटं बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत.