“कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही, तो एक प्रतिमात्मक नारा आहे”

0
466

मुंबई,दि.१५(पीसीबी) – कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही, तो एक प्रतिमात्मक नारा आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही तर तो एक प्रतिमात्मक नारा आहे. कोरोना हा विषाणू लवकरात लवकर भारतातून आणि जगातून हद्दपार व्हावा, असा मानस ठेऊन ती घोषणाबाजी केलेली होती, असं आठवले यांनी म्हटलं आहे. ‘कोरोना गो असा मी दिला होता नारा, तेव्हा जागा झाला होता भारत सारा… जगातल्या ११० देशांत चमकतो आहे कोरोनाचा तारा अन् एक ना एक दिवस आपण वाजवू कोरोनाचे बारा….,’ अशी कविता देखील आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोना गो म्हणून कोरोना जाणार नाही हे मलाही समजतं पण ती प्रतिकात्मक घोषणा होती. ‘अब आप मत रोना क्यों कि जल्दी ही चला जायेगा यहाँ से कोरोना… जितना सोना हैं उतना सोना मगर किसीके हात में हात मत देना’… असं आवाहन आठवलेंनी केलं आहे.