मुंबई,दि.११(पीसीबी) – कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या, असं म्हणणार का? असं सवाल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिका करणार्यांना केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या,’ असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. मी कुणावरही टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी भूमिका मी घेतली आहे, असं आठवले म्हणाले आहेत.
मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी काही मूळचे चीनचे असलेलं नागरिक बॅनर घेऊन उभे होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर ‘गो करोना. गो. गो करोना. गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
दरम्यान, कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी भूमिका मी घेतली आहे, असं आठवलेंनी सांगितलं आहे. त्यांनी काल कोरोनो गो, कोरोनो गो अशी कविता म्हटली होती. त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.