…त्यामुळे भविष्यात आमचे सरकार येण्याची शक्यता – रामदास आठवले

0
359
मुंबई, दि.११ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, “मध्य प्रदेशाप्रमाणे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही बदल होतील. महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येऊ शकते”.
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होईल असे भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. उद्धव ठाकरे महाविकासआघाडीत नाराज असून लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार भाजपात येतील असंही ते म्हणाले आहेत.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना घेरले असून ते प्रचंड काळजीत आहेत. उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा परत येतील असे मला वाटते. उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भविष्यात आमचे सरकार येण्याची शक्यता आहे,” असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. .