कोणत्याही पत्रकाराची हिंमत झाली नसती, तो प्रश्न अक्षयकुमारने मोदींना विचारला – राज ठाकरे   

0
772

पनवेल, दि. २६ (पीसीबी) – अभिनेता अक्षयकुमार यांनी पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली.  अक्षयकुमारने   मोदींना मुलाखतीत जो प्रश्न विचारला. तो प्रश्न पत्रकारांना विचारण्याची हिंमत झाली नसती, अशा शब्दांत राज यांनी खिल्ली उडवली.   

अक्षय कुमारने पंतप्रधानांना काय प्रश्न विचारावा? आंबे खाता का? मजा लावली आहे का? असा सवालही राज यांनी उपस्थित केला.   पनवेलमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत राज यांनी भाजपसह मोदींवर हल्ला चढवला.

आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता, भाजपवाले वेगळ्याच वावड्या उठवत आहेत. भाजपने देशातील सर्वच महत्वाच्या संस्थांची मुस्कटदाबी केली. डिजिटल इंडिया, कॅशलेश इंडिया, रोजगार निर्मितीचे आश्वासन आदी मुद्द्यांवरुन राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर   घणाघात केला.