काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले – आशिष शेलार

0
763

मुंबई,दि.१२(पीसीबी) – राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या CAB मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे. आता शिवसेना शेलारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेने सांगावं की रात्रीत असं काय घडलं की, शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा का दिला नाही ? या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात, अशी टीका अमित शहा यांनी लोककसभेतील भाषणादरम्यान केली.