भाजपने दडपशाहीने नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करवून घेतले – संजय राऊत

0
398

मुंबई,दि.१२(पीसीबी) – भाजपने राज्यसभेत दडपशाही करुन नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करुन घेतले, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

राज्यसभेत बोलत असताना माझा माईक बंद करण्यात आला होता. संसदीय पक्षाचा नेता असूनही भाजपने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अनेक लहान पक्षांना आमिष दाखवण्यात आले होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपने संसदेत एकप्रकारची आणीबाणीच लागू केली होती. अशा प्रकारची आणीबाणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही संसदेत आणली नव्हती. माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर संसदेत दडपशाही होत आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.