काँग्रेस म्हणजे बेशिस्तांचे नंदनवन; थेट राहुल गांधींसमोर घरचा आहेर

0
465

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पक्षातील कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि वरिष्ठ नेत्यांच्या अहंकार आणि लॉबीमुळे समस्या निर्माण होत आहे, अशी तक्रार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी थेट अध्यक्ष राहुल गांधींकडेच केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत पक्षाला घऱचा आहेर दिला आहे.