कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका; मराठा क्रांती मोर्चा लोकसभा लढवणार

0
1025

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चा आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची  आज (शनिवारी) मुंबईत केली. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे.  भाजपच नव्हे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्यायच केला आहे, असेही क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, अशा  अनेक  मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाने मोर्चा काढला होता.

मराठा आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची  अंमलबजावणी  झालेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र,  हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही, तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा इशाराच मराठा संघटनांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर  मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची   आज  मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.  मोर्चे काढून काहीही साध्य होत  नाही, त्यामुळे दबाव आणण्याची   आम्ही भूमिका घेणार आहे. प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप  करण्यात येणार आहे,  असे यावेळी सांगण्यात आले.