उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे – देवेंद्र फडणवीस

0
446

मुंबई,दि.८(पीसीबी) – उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप या तरुणानं केला आहे. यावरून फडणवीस यांनी आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं होतं.