आधी भाजपचा पराभव करू, त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करू – राहुल गांधी

0
458

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीत आधी भाजपचा पराभव करायचा       त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करू,  अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांनी मांडून मित्रपक्षांची इच्छा असेल, तर आपण निश्चितपणे  पंतप्रधान  होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत आल्यास छोट्या उद्योजकांना आधार  देणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच कमी खर्चात वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.