यवतमाळ , दि. १० (पीसीबी) – यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी आज (गुरूवार) येथे दिली.