शब्द माझ्याकडेही आहेत, मलाही बोलता येते; रावसाहेब दानवेंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

0
578

मुंबई, दि. १० (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ज्या पध्दतीने वैयक्तिक टीका करत आहेत. त्यावरून त्यांची पातळी समजते. शब्द माझ्याकडेही आहेत, मलाही बोलता येते. उद्धव ठाकरे सगळ्यांवर टीका करतात, पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री तसेच माझ्यावरही टीका करतात हे योग्य नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.  

बीड येथील सभेत ‘रावसाहेब दानवे यांना आता रडवण्याची वेळ आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ठाकरे यांच्या या टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवरून दानवेंच्या विरोधात रान पेटविणार असाल तर अर्जुनराव तुम्हाला कोणी अडविणार नाही. दानवे शेतक ऱ्यांना ‘रडताहेत साले’, असे म्हणाले होते.  असे सांगून ठाकरे म्हणाले,की दानवे तुमच्यावरही रडण्याची वेळ येईल. तुमच्यावर रडण्याची वेळ आली म्हणजे कळेल. प्रत्येकाची वेळ येते. आता आम्ही हसतो तुम्ही रडा! , अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे.