आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

0
612

 यवतमाळ , दि. १० (पीसीबी) – यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी आज (गुरूवार) येथे दिली.

त्याचबरोबर संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अशावेळी उपाध्यक्षच महामंडळाचे काम पाहणार आहेत. हे संमेलन सर्वांचे असून, यात सहभागी होण्याचे आवाहन विद्या देवधर यांनी केले आहे.

दरम्यान, नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याबाबतचे सर्व आरोप संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी फेटाळले आहेत. निमंत्रणाच्या वादावर येरावार यांनी नाव न घेता साहित्य महामंडळाकडे बोट दाखवले आहे.  तर संमेनलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.