अटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली ? – संजय राऊत

0
650

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली होती, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२ आणि १३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशी  होणाऱ्या भाषणात अडथळा नको, तसेच   स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको. यामुळे वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली  का?  असाही सवालही  राऊत यांनी उपस्थित केला आहे.