अजित पवारांचे ‘ते’ विधान जनता विसरलेली नाही – अमित शहा

0
1436

पुणे, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय विधान केले होते, हे जनता विसरलेली नाही, असे सांगून  महाराष्ट्राला खाली आणण्याचे काम काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने केले आहे, अशी सडकून टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवार) येथे  केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी  शक्तिकेंद्र प्रमुख, बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला मागदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, यांच्यासह खासदार, आमदार, पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहा म्हणाले की, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील भ्रष्ट्राचार संपवण्याचे काम आपल्या सत्ताकाळात केले आहे.  देश आणि जनतेसाठी आपण आगामी निवडणूक जिंकणे महत्वाचे  आहे. देशाचे जेवढे राजकीय पक्ष चालतात, त्या सर्वात भाजप वेगळा आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांची आहे ना की नेत्यांची.  २०१४ नंतर आपण आजवर कधीही न जिंकलेल्या ठिकाणी विजय मिळवला आहे. बूथ रचना आणि तिथे काम करणारा कार्यकर्ता हे पक्षाच्या विजयाचे कारण आहे, असे शहा म्हणाले.