कोलकाता, दि. २० (पीसीबी) – भाजपच्या रथयात्रेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शविला होता. अखेर पश्चिम बंगालमधील भाजपच्या ३ रथयात्रांना कोलकता उच्च न्यायालयाने आज (गुरूवारी) परवानगी दिली आहे. रथयात्रेवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी, असेही आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे ममता बॅनर्जी यांना चपराक बसल्याचे मानले जात आहे.