मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ‘राष्ट्रवादी पक्षामध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही केवळ मराठा समाजाला देण्यात येत आहेत,’ असा घणाघाती आरोप करणार एक निनावी पत्र व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भूकंप आला आहे. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे, असा दावा पत्र लिहिणाऱ्याने केला आहे.
एकीकडे आपला पक्ष पुरोगामी असल्याचे म्हणत शरद पवार नेहमी पक्षात सर्व जातीच्या लोकांना स्थान दिले तर पक्ष वाढेल, असे म्हणतात. मात्र दुसरीकडे या पत्रामुळे वेगळीच सत्यस्थिती समोर येत असल्याने पक्ष एकाच जातीच्या नेतृत्वात चालवा काय अशी पक्षनेतृत्वाची इच्छा आहे की काय,’ असा प्रश्नही या निनावी पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.
वंदना चव्हान यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना मात्र कोलमडली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,’ असे म्हणत या पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.