दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना ‘गुन्हेगार’ म्हटल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी रविवारी चौहान यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवराजसिंह चौहान जवाहरलाल नेहरु यांच्या पायाची धूळही नाहीत. असे वक्तव्य करताना चौहान यांना लाज वाटायला हवी होती,’ असे मत दिग्विजय यांनी व्यक्त केले आहे.
चौहान यांनी नेहरुंना गुन्हेगार म्हणण्यावरुन झालेल्या वादासंदर्भात दि्ग्विजय यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना दिग्विजय चांगलेच संतापले. “चौहान हे नेहरुंच्या पायाची धूळही नाहीत. त्यांना लाज वाटायला हवी. त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी,” असे मत व्यक्त केले आहे.
देश के प्रथम प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरू जिन्हें आधुनिक भारत का निर्माता कहा जाता है,जिन्होंने आज़ादी के लिये संघर्ष किया,जिनके किये गये कार्य व देश हित में उनका योगदान अविस्मरणीय है।
उनको मृत्यु के 55 वर्ष पश्चात् आज अपराधी कह कर संबोधित करना,बेहद आपत्तिजनक व निंदनीय है।— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) August 11, 2019