महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय – देवेंद्र फडणवीस

0
605

मुंबई,दि. २३(पीसीबी) – महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावं ठेवली तीच पद्धत यांनी आत्मसात केली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारची अजूनही कोणतीच दिशा ठरत नाही आणि सूरही गवसत नाही. आधी स्वतः त्यांनी आपल्यात सुसंवाद करावा नंतर विरोधी पक्षांशी संवाद साधावा, असं म्हणत फडणवीस यांनी तिन्ही पक्षांना टोला लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एनआयएकडे तपास आणि सीएए या दोन्ही बाबतीत त्यांनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.