जनतेने अरविंद केजरीवालांना धडा शिकवला पाहिजे – अण्णा हजारे

0
503

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चुकीच्या मार्गाने पुढे जात असतील,  तर अशा लोकांना जनतेनेच धडा शिकवला पाहिजे.  केवळ केजरीवालच नाही, तर कुणीही असो. जोपर्यंत अशा लोकांना जनता धडा शिकवणार नाही, तोपर्यंत यांना अद्दल घडणार नाही, अशा शब्दांत  ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.  

दिल्लीतील लोकसभेचे आपचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने  आपल्या वडिलांनी तिकीटासाठी केजरीवाल यांना ६ कोटी रुपये दिल्याचा  खळबळजनक  आरोप केला आहे.  यावर हजारे यांनी प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला.

अण्णा हजारे म्हणाले की, ज्या भ्रष्टाचारी पक्षाच्या विरोधात आम्ही लोकपाल कायद्यासाठी आंदोलन केले. आता त्याच पक्षासोबत अरविंद केजरीवाल हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा त्यांचा सर्वात मोठा दोष आहे,  अशीही खंत त्यांनी  व्यक्त केली.