‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण

0
856

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’ अशी प्रतिक्रिया आज (मंगळवार) जाहीर झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या निकालामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. २०१९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, असे चव्हाण म्हणाले.

आता मोदी लाट ओसरली असून देशात मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव जाणवला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर करडी नजर ठेवल्यामुळे भाजपला मतदान यंत्रात फेरफार करणे शक्य झाले नाही, असा दावा त्यांनी केला.  हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. भाजप मोजक्या उद्योगपतींसाठी सत्तेचा वापर करते होते. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. तिरस्कारावर प्रेमाचा आणि अहंकारावर नम्रतेचा विजय आहे, असे  चव्हाण म्हणाले.