नागपुरातून देशाचे सरकार चालत नाही – मोहन भागवत

0
332

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – राजकारणावर आमचा कोणताही प्रभाव नाही आणि त्यांच्या सरकारवरही आमचा प्रभाव नाही. ते स्वयंसेवक आहेत. त्यांचाही स्वतःचा विचार आहे. या स्वातंत्र्याने आणि स्वायत्ततेनेच सरकार चालवले जाते. नागपुरातून देशाचे सरकार चालत नाही, असा टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विरोधकांना लगावला.