20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न, रिक्षाचालकाची हत्या

0
456

अंबरनाथ, दि. १५ (पीसीबी) – प्रेमविवाहाच्या वादातून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये गुरुवारी (13 मे) घडली होती .. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विजय नवलगिरे असं हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव होतं. विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेच्या एका 20 वर्षीय तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं होतं. यावरून त्या परिसरातल्या काही तरुणांशी विजयचे वाद निर्माण झाले होते. त्यावरूनच विजय हा गुरुवारी घरी असताना 8 ते 9 तरुण विजयच्या घरी आले आणि दार तोडून घरात घुसले. यानंतर त्यांनी विजयवर कटरने वार केले. त्यानंतर त्यांनी डोक्यात फरशी घातली आणि नंतर दगड घालून त्याची हत्या केली..
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना लगेचच बेड्या ठोकल्या. तर उर्वरित तिघांना रात्री अटक करण्यात आली. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या प्रकरणात फरार असलेल्या इतर 4 आरोपींचा पोलीस शोध घेतायत. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
विजय याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमला राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर विजय आपल्या पत्नीसह अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला गेले काही दिवस त्रास देत होते. आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून हे तरुण विजयला त्रास देत होते. या वादातूनच आज दुपारी 3.30 च्या सुमारास 5 ते 7 तरुण विजयच्या घरी आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करीत विजयला घराबाहेर आणले. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. गुंड तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत, यानंतर विजयच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली.