हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल,असा मला विश्वास आहे – देवेंद्र फडणवीस

0
184

मुंबई,दि.२८(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरणे जुळविली जाणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, दरम्यान हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल,असा मला विश्वास आहे. सरकार पडल्यावर काय करायचे ते पाहू. भाजप विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

भाजप व शिवसेनेकडून राजकीय मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे खंडन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ‘ साठी फडणवीस यांची मुलाखत बिहार निवडणुकीनंतर होणार असून त्याचे प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेना-भाजपमधील गेले वर्षभर ताणले गेलेले व तुटलेले संबंध पुन्हा जुळविण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान यासंदर्भात फडणवीस म्हणाले, ही भेट मुलाखतीसंदर्भातच होती आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हे सरकार पाडण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल,असा मला विश्वास आहे. सरकार पडल्यावर काय करायचे ते पाहू. भाजप विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.