हा नवा भारत आहे, येथे आडनावाला महत्त्व नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
363

दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – हा नवा भारत आहे, येथे तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही. तर आपल नाव सिद्ध करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज (शुक्रवार) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधून नवा भारत या विषयावर आपल मत मांडले आहे. हा नवा भारत आहे जिथे तरुणांच आडनाव काय आहे यामुळे फरक पडत नाही. तर आपल नाव सिद्द करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. काही मोजक्या लोकांचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख आहे. नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो, असे नरेंद्र मोदी यावेळी बोलले.

भाषेचा फायदा घेत अनेकांनी भारतात स्वार्थापोटी विभागणी करत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची खंत देखील मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच भाषेतही ताकद असून त्याचा वापर करत आपण सर्वांना एकत्र आणल पाहिजे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.