नांदेड, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याची टीका केली जात आहे. मोदी यांचे कुटुंब ही जनता आहे. स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणे करतात चोर कुठले, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
नांदेड जिल्ह्यातील नरसीमध्ये एका खाजगी पुरस्कार वितरण सोहळ्यात पंकजा बोलत होत्या.
पंतप्रधान मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला आपले कुटुंब समजून काम करतात. मात्र हे कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणे करतात. चोर कुठले, यांनी या राज्याला लूटले, या देशाला लुटले आणि हे लोक सांगतात की नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही.
यावेळीपंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. नांदेड जिल्ह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली. पण नांदेड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आजही नरसी येथे पाण्याची समस्या आहे. माझ्याकडे राज्याचे मंत्रीपद असले, तरी मी बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत नाही, असे त्या म्हणाल्या.