सत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली – चंद्रकांत पाटील

0
323

नवी मुंबई,दि.१६(पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “शिवसेनेनं सत्तेसाठी सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली आहेत. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे” अशी टीका केली आहे. नवी मुंबईत भाजप प्रदेश राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेनं केला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तेपायी महापुरूषांचा अपमानही शिवसेना आज सहन करत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.