भाजप ही हरलेली नाही तर जिंकलेली टीम आहे – देवेंद्र फडणवीस

0
318

मुंबई,दि.१६(पीसीबी) – मुंबईत भाजपच्या महाअधिवेषणात बोलत असताना “भाजप ही हरलेली नाही तर जिंकलेली टीम आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही” असं प्रतिपादन विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरजार टीकास्त्र सोडलं आहे.

काही लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मात्र, अशा लोकांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं ते म्हणाले आहेत. केवळ सत्ता हा आमचा उद्देश नाही तर समाजात आर्थिक, सामाजिक बदल करणे हे आमचे उद्धीष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपला देशात मोठ्या नेत्यांची पंरपरा आहे. तसेच भाजपला कोणतेही पद वारसात मिळत आहे. इथे पद कमवावं लागतं. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, असंही फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

दरम्यान, काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेशिवाय त्यांची अवस्था पाण्याविना माशासारखी होते. त्यामुळेच ते अभद्र आघाडी करुन सत्तेत येत असतात, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.