सत्ताधाऱ्यांना सोडून आमच्यावर टीका करत आहेत ; शरद पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

0
416

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – वंचित आघाडी ही जे सत्तेत आहेत, त्यांच्यावर टीका न करता आमच्यावर टीका करत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांना  लगावला आहे.

शरद पवार यांनी आज  (रविवार) आपल्या Sharad Pawar Live या फेसबुक पेजवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच लोकांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. तसेच पवारांनी वंचित बहुजन आघाडीवर  निशाणा साधला.

वंचित आघाडीने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत वारंवार शरद पवारांवर टीका केली आहे. या टीकेलाही  पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, मी केलेल्या कामाचा मला उदोउदो करणे आवडत नाही. पण आता मला वाटायला लागले आहे. जे काम केले, ते जनतेला सांगितले पाहिजे, असे म्हणत पवार यांनी पंतप्रधान  मोदी यांनाही  टोला लगावला.

पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला.