भावाला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून संजय राऊत बिथरले – विनोद तावडे

0
566

मुंबई,दि.१८(पीसीबी) – भावाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून संजय राऊत बिथरलेत, असं म्हणत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलतात तसं खरंच त्यांचा त्यामागील काय विचार आहे. राऊतांना असं वक्तव्य करुन एखादा विषय बाजूला सारायचा असतो. ज्यामुळे त्यांनी आधीच एखादा वाद उभा केला तो बाजूला सारुन दुसरा वाद उभा करायचा असतो की काय?, असा सवाही यावेळी तावडे म्हणाले आहेत.

संजय राऊत जे बोलले ते त्यांना खरंच करायचं असेल तर राहुल गांधींचा नंबर पहिला लागतो. राहुल गांधींना दोन दिवस तुरुंगात पाठवावं लागेल. हे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि अशोक चव्हाणांना चालणार आहे का? असा सवाल तावडेंनी यावेळी केला आहे.

वीर सावरकरांना ज्या कारागृहात बंदिस्त करण्यात आलं त्याचं कारागृहात दोन दिवस तरी जाऊन राहून बघायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.