शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम हे सरकार करेल – नाना पटोले

0
326

मुंबई,दि.२८(पीसीबी) – शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार महत्वाचं काम करेल आणि पाच वर्षच नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार टिकेल असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. आशिष शेलार काल जे काही बोलले असतील ते शुद्धीत बोलले नसतील असा खोचक टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुरुवारी महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचेही दोन नेते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे दोन नेते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. यावर पटोले म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेल.

महाविकासआघाडीचे आमदार शेलारांना दिसले नसतील अशा शब्दांत पटोलेंनी टीका केली आहे. उद्या काँग्रेसचे आमदार शिस्तीत वागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या बंडखोर कोण आणि जाणीवपूर्वक गोंधळी कोण हे उद्या महाराष्ट्राला दिसेल असंही पटोले म्हणाले आहेत.