शिवसेना-भाजपचे अनेक नेते एमआयएमच्या संपर्कात – खासदार जलील यांचा गौप्यस्फोट

0
438

औरंगाबाद, दि. १ (पीसीबी) – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना-भाजपचे लोक मला येऊन भेटत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलीच खळबळ उडाली आहे.

इम्तियाज जलील हे एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांनी औरंगाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. तसेच या निवडणुकीत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हेही मैदानात होते.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तशी भीती असल्यामुळेच अनेक नेते जलील यांच्याकडे उमेदवारी मागत असल्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.