शरद पवार जोपर्यंत आदेश देत नाहीत, तोपर्यंत अफवा ठरेल – सतिश पाटील

0
1363

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जोपर्यंत आदेश देत नाहीत, तोपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची ही अफवाच ठरेल,  असे   आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.  शुक्रवारी  पवारांनी   मुंबईत लोकसभा उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली.

रायगड, कोल्हापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि जळगाव या ठिकाणी काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  रायगडमधून सुनिल तटकरे, रावेरमधून संतोष चौधरी, बीडसाठी जयदत्त क्षीरसागर, उस्मानाबादमधून राणा जगजितसिंग, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

परभणीसाठी बाबाजानी दुर्राणी आणि फौजियाखान या दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्यात येणार आहे.    जळगाव मधून देवकर आणि सतीश पाटील यांनी नकार दिल्याने नवीन  उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. मात्र, भाजप नेते एकनाथ खडसे गळाला लागले. तर रावेरमधून आमदार चौधरींचा पत्ता कट केला जाण्याची   शक्यता आहे.