कोल्हापूर, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्तांसोबत रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी उपस्थितीत महिलांनी पवारांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले.
मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबासह पवारांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला असून महापूराच्या संकटाला आपण एकत्रपणे तोंड देऊ.
तसेच पवार यांनी कोल्हापूर येथील बापट कॅम्पमध्ये संत गोरा कुंभार वसाहतीत पूरग्रस्त झालेल्या नागरिकांची भेट घेतली . येथे गणपती कारखान्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या मागण्या सरकारकडे तातडीने पोहचवण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.