शरद पवारांच्या नावावर मते मागायचे दिवस संपलेत – गिरीश बापट

0
744

मंचर, दि. ७ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर मते मागायचे दिवस संपले आहेत. यापुढे आश्चर्यकारक  निकाल लागल्याचे दिसून येईल. आता सगळीकडे  कमळ फुलविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी  साथ द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनते पर्यंत पोहोचवा,  असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

मंचर शहर व आंबेगाव तालुक्यातील  विविध विकास कामांचे भूमिपूजन  बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बापट  म्हणाले की, भाजपला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत साहेब,दादा, ताई यांच्या बरोबर टक्कर द्यावी लागणार आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर  पुणे जिल्ह्यात इतिहास घडविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव व वाड्या वस्त्यावर बूथ कमिट्या स्थापन करून पक्षाची बांधणी   करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.