वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल; भुजबळांच्या प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंचे सुचक वक्तव्य

0
469

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रावदी काँग्रेसमधून सध्या अनेंक दिग्गज नेते शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दोन दशकांपुर्वी शिवसेना सोडून आलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते छगन भूजबळ यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चेला सध्या ऊधाण आले आहे. देशासह राज्यातील राजकीय समिकरणे आता बदलली आहे. वा-याची दिशा बदलली आहे. आघाडी सत्तेत येणार अशी आशा मावळली आहे. भाजप पर्व देशात आणि राज्यातही सुरू होणार असे दिसत आहे. या पार्श्वभूमिवर आघाडीचे नेते सत्ताधारी पक्षात जाणे पसंत करत आहेत.

काही आठवड्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने छगन भूजबळ राष्ट्रवादी सोडून स्वगृही परतणार असे बोलल्या जात आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले असता. त्यांनी सुचक वक्तव्य केले आहे.

“वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भूजबळ यांच्या शिवसेनाप्रवेशाविषयीची शक्यता अधिक बळावत आहे. तर दुसरीकडे खरोखरच छगन भूजबळ शिवसेनेत परत येणार का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.