लोक सोडून जातील म्हणून पवारांकडून उमेदवारांची घोषणा; पंकजा मुंडेंचा टोला

0
419

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर असून, बुधवारी बीडमध्ये पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावरून राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. “लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली,” असे म्हणत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून पवारांना टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर आहे. सोलापूर, उस्मानाबादनंतर पवार यांची बुधवारी बीडमध्ये सभा झाली. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली.

शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात आहे. त्या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली आहे,” असे सांगत परळीतून धनंजय मुंडे यांच्या उमेवारीवर पंकजा म्हणाल्या,”परळीची आमदार मीच होणार आहे.”