लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तीन राज्यात पराभव घडवून आणला – शरद पवार

0
658

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विजय मिळवला. आणि लोकसभा निवडणुकीत त्याच ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर हा पराभव घडवून आणला नाही ना, अशी शंका  निर्माण होत आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी ट्विटरवर पोस्ट लिहीत ईव्हीएम मशीनबाबत पुन्हा एकदा  संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाला. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस  पक्ष विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.  निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपले मत बरोबर गेले की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.