राष्ट्रवादीत सनातनी; जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करून युतीसाठी पुढे यावे – प्रकाश आंबेडकर

0
649

पंढरपूर, दि. २० (पीसीबी) – भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सनातन्यांची घुसघोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे यांना वाचविण्यात कोण पुढे आहेत, हे आम्ही दाखवून दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युतीचा हात पुढे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असा टोला आंबेडकरांनी लगावला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने  लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात, आमचे काहीच म्हणणे नाही. त्यामुळे काँग्रेसवर अवलंबून राहण्याचा प्रश्नही येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आता आम्हाला युतीसाठी हात पुढे करत आहे. मात्र आम्ही जेव्हा काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एमआयएम सोबत आमची  युती आहे. त्यामुळे काँगेसवर अवलंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसच्या प्रस्तावावर आमच्या बैठकीत विचार करू, असे ते म्हणाले.