माझ्याविरोधात लढल्यास रावसाहेब दानवेंचे लंगोट पण राहणार नाही – बच्चू कडू

0
599

जालना, दि. १५ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि माझ्यात खानदानी शत्रुत्व नाही. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हटले आहे, याचाच मला राग आहे. त्यांनी शेतकऱ्यांना साले बोलून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे, असे अपक्ष आमदार बच्चू कडू  यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे अस्तित्व आणि अस्मिता दाखविण्यासाठी मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रहार संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त बच्चू कडू जालना दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब दानवेंनी माझ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल आणि लंगोट पण राहणार नाही, असे थेट आव्हान त्यांनी दानवेंना दिले आहे.

दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असाही निर्धार बच्चू कडू यांनी काही दिवसापूर्वी बोलून दाखवला होता. गेल्या महिन्यातच जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीला बच्चू कडू यांनी सुरुवात केली आहे.