रावसाहेब दानवेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवल्यास डिपॉझिट जप्त होईल – बच्चू कडू

0
518

जालना, दि. १५ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि माझ्यात खानदानी शत्रुत्व नाही. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हटले आहे, याचाच मला राग आहे. त्यांनी शेतकऱ्यांना साले बोलून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे, असे अपक्ष आमदार बच्चू कडू  यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे अस्तित्व आणि अस्मिता दाखविण्यासाठी मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.