“राज्यसरकारने म्हणूनच सीबीआयला ‘नो एन्ट्री’ केली”- किरीट सोमय्यांचा टोला

0
240

मुंबई,दि.२२(पीसीबी) : आताच महाराष्ट्र सरकारने सीबीआयच्या सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेत आता यापुढे सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. असा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत मोठ्या नेत्यानी आपली मत व्यक्त केली. मात्र आता सरकारच्या या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “सीबीआयला महाराष्ट्रात एन्ट्री नाही असं सरकार म्हणतं आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हाती लागली, तर सर्व बाहेर येईल अशी भिती त्यांना वाटते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी सीबीआयची परवानगी निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

पुढे टोला लगावत किरीट असंही म्हणाले कि,”सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोललं की, हे सरकार त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करतं. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकतात.”