मुंबई,दि.१८(पीसीबी) – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी “राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपने मुंबईतून 500 कोटी रुपये पाठवण्यात आले” असा गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही ती राज्यं अस्थिर करण्याचा पद्धतशीर अजेंडा राबवत आहे अशीही टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
गेहलोत सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. सचिन सावंत यांनी हा नवा आरोप करुन खळबळ माजवून दिली आहे.
We have got information that collection of more than ₹500 crores have been done from Mumbai in order to topple the @ashokgehlot51 ji led @INCIndia govt in Rajasthan. I have spoken to @AnilDeshmukhNCP ji and requested him to look into this serious matter to find the masterminds. https://t.co/mXh4afPJZP
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2020
दरम्यान फक्त राजस्थानच नाही तर कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईमधल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भात बैठका होत होत्या. राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी मुंबईतल्या बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी जमा केले आणि ते राजस्थानला पाठवले, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.