पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेस सत्तेत असताना राष्ट्रवादी अध्यक्ष व खासदार शरद पवार यांचा पंतप्रधानपदी नंबर लागला असता, मात्र आता यापुढे कधी त्यांचा नंबर लागेल, असे मला अजिबात वाटत नाही. त्यावेळी शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले, त्यामुळे त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.
पिंपरीमध्ये आज (रविवार) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.