मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटलांच खरमरीत उत्तर. म्हणाले…”देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…’

0
252

मुंबई,दि.२०(पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थिल्लरपणा करु नये, जबाबदारी झटकू नका, असं म्हटलं होत. फडणवीस यांनी केलेल्याया वक्त्यव्यावर उत्तर देत ‘फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना म्हंटल आहे. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानीं देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हंटले कि, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला. असे शब्द वापरणे चुकीचं आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही”, असं वक्तव्य काही दिवसांपुरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.